दरवर्षी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जाते. त्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पाच ते सात किलोमीटर अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील.वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. एसएससी-एचएससी बोर्डाने या वर्षीपासून सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला असून हा निर्धार पूर्णत्वास जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने शालेय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या आहेत.