एकविसाव्या शतकामधला विज्ञान व तंत्रज्ञानातील वेग व जागतिकीकरणाची प्रक्रिया यांमुळे आपल्या जीवनशैलीत फार मोठा बदल झाला आहे. त्याचे परिणाम वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर झालेले दिसत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी काही आवश्यक अशी जीवनकौशल्ये आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे होणार्या बदलांना आपल्याला व आपल्या मुलांना सामोरे जाऊन त्यांच्याशी समायोजन करणे आवश्यक आहे.
पालक आणि शिक्षक मित्रांनो, आठवून पहा आपलं लहानपण. एकत्र किंवा मोठ्या कुटुंबातील वडिलधार्या व्यक्तींकडून आपल्याला मिळालेल्या गोष्टी म्हणजे सवयी, संस्कार, मूल्ये, मार्गदर्शन इत्यादी आणि आता आपल्या मुलांना मिळणार्या गोष्टी यामध्ये फार तफावत आहे. ज्या गोष्टी आपण घरात सहज व नकळत शिकत होतो, त्या आज काळ बदलल्यामुळे मुद्दाम शिकवाव्या लागत आहेत. या गोष्टींचा आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा लागतो आहे. मात्र एक बाब आहे, की कुटुंब आणि शाळा दोन्हींचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे मुलाच्या/ विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे. खरं म्हणजे या कामात सर्वच सामाजिक घटकांचाही हातभार असावा.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं वय हे अत्यंत संस्कारक्षम वय असतं. त्यामुळे मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतील अशी कौशल्ये शालेय वयातच शिकणे आवश्यक आहे. आणि नुसती शिकून नव्हे तर ही कौशल्ये शिकल्यावर आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचे उपयोजन करता आले पाहिजे. तरच एक संतुलित व्यक्तिमत्त्व आकाराला येईल.
या जीवनोपयोगी कौशल्यांनाच ‘जीवनकौशल्ये’ म्हटले आहे. यांच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये असलेल्या मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्वोत्कृष्ट क्षमतांचा विकास करणे म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे. यासाठी 1997 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे थेीश्रव कशरश्रींह जीसरपळूरींळेप (थकज) ने वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी मार्गदर्शनपर पुढील दहा मूलभूत कौशल्ये दिली आहेत. याखेरीज अजून असंख्य कौशल्ये असू शकतात जी सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरू शकतील. संघटनेच्या या दहा जीवनकौशल्यातून दैनंदिन जीवनातील आव्हाने पेलताना स्वतःशी, इतर व्यक्तींशी आणि पर्यावरणाशी संतुलित व्यवहार करण्याचे सामर्थ्य अंगी येते.
जीवनकौशल्ये
8.परिणामकारक संप्रेषण (Effective Communication )
जीवनविषयक भारतीय दृष्टिकोन आणि जागतिक आरोग्य संघटनेने 1997 मध्ये केलेल्या जीवनकौशल्ये शिक्षणाच्या व्याख्येत एकवाक्यता दिसते. या जीवनकौशल्यांविषयी थोडक्यात माहिती पाहू-
म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता. या क्षमतेमुळे व्यक्तीला स्वतःच्या आवडी-निवडी, आवडीचे क्षेत्र/क्षेत्रे, स्वतःच्या प्रवृत्ती, स्वतःची बलस्थाने आणि स्वतःमधील कमतरता/उणीवा, भावना या सर्वांबद्दल विचार करता येतो. अशा पद्धतीने स्वतःबद्दल विचार करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.
म्हणजे दुसर्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता. अजून स्पष्ट सांगायचे झाल्यास, दुसर्या व्यक्तीच्या जागी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून घेण्याची कुवत. इतरांच्या भावनांशी समरस होणे. त्या व्यक्तीच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करणे. त्यातून आपल्याला काय वाटले असते हे समजेल आणि सहानुभूती वाटेल. स्वतःच्या दुःखावर मात करण्यास मदत होईल.
म्हणजे जीवनात येणार्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधून त्यानुसार कार्यवाही करणे. समस्या लहान असो किंवा मोठी, त्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग शोधणे आवश्यक असते. गोंधळवून टाकणार्या अवघड परिस्थितीतून मार्ग शोधून काढण्याच्या प्रक्रियेला समस्या निराकरण म्हणता येईल. ही प्रक्रिया अशी असते.
समस्या- वैयक्तिक विचार- समस्यांचा प्राधान्यक्रम- कारणांचा शोध- समस्येचे पृथःकरण- समस्येवर मात करण्यासाठी उपाय- समस्या निराकरण.
जीवनातील अनेक लहान-मोठ्या समस्यांनी आपण त्रस्त होत असतो, त्यावर चिकित्सक विचार करून परिणामकारकरीत्या सोडवण्यासाठी आपण किती समर्थ आहोत यावर आपले यश अवलंबून असते.
ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती किंवा गट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो, मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करतो आणि योग्य पर्याय निवडतो.
निर्णयकौशल्य क्षमता-
पर्यायांचा विचार- पूर्वानुभव/ सद्यस्थितीचे निरीक्षण- परिणामांचा विचार- योग्य पर्याय निवड- निर्णय
(Effective Communication)
संदेश पाठवणार्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्याचा संदेश स्वीकारणारा स्वीकारतो, त्या वेळी परिणामकारक संप्रेषण होते. म्हणजे आपण किती परिणामकारकपणे आपले विचार व्यक्त करतो ही बाब आपल्याला मिळणारे यश निश्चित करते.
प्रक्रिया- संदेश देणारा- संदेश- संदेशाचे प्रसारण- संदेश घेणारा- संदेशाचे ग्रहण- अर्थ लावणे- संदेशाचे आकलन- अपेक्षित परिणाम/ प्रतिसाद- संदेश देणारा
संप्रेषण म्हणजे माहिती अथवा संदेश एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होणे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांची जोपासना करत स्वतःचा, समाजाचा व जगाचा विकास शक्य होतो. त्यासाठी परिणामकारक संप्रेषण करून परस्परातील सहसंबंध जिव्हाळ्याचे, सलोख्याचे व सौख्याचे ठेवतं येतात.
(Inter Personal Relations)
दैनंदिन जीवनात ज्यांच्याशी नेहमी आपले संबंध असतात ते सर्वार्थाने निकोप ठेवण्याचे प्रयत्न म्हणजे हे कौशल्य. व्यक्ती-व्यक्तींमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यांच्यावर परस्पर संबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा, सहकार्य यांमुळे परस्परांशी नाती जुळवली जातात, त्यावेळी नात्यांचा दर्जा उच्च असतो.
प्रक्रिया-
परस्परांविषयी विश्वास- आदर- सहकार्याची भावना- सहिष्णूता- समायोजन- एकमेकांच्या भल्यासाठी एकत्र येणे. माणसांची दुरावलेली मने, संबंध पुन्हा एकत्र येण्यासाठी वरील प्रक्रिया उपयोगी ठरते. मात्र त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असते.
(Creative Thinking)
एखादी गोष्ट करण्याची पद्धत शोधणे किंवा अस्तित्त्वात असलेल्या प्रक्रियेचा पूर्णपणे नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी वापर करणे म्हणजे सर्जनशील विचार किंवा सर्जनशीलता.
असे चिंतन जे काहीतरी नवीन, उपयुक्त व असाधारण निर्माण करते किंवा शोधून काढते त्याला सर्जनशील चिंतन/ विचार म्हणता येईल.
सर्जनशील विचार प्रक्रिया-
नेहमीपेक्षा वेगळा विचार- विविध प्रतिसादांचा विचार- त्यातून नवीन विचारांना चालना- नाविन्याचा शोध- नवनिर्मिती
कुतूहल, गरज किंवा समस्या यांच्या पूर्ततेसाठी चाकोरीबाहेरील मार्गाने जाऊन विचार करणे म्हणजे सर्जनशील विचार. उदा., संपर्काच्या गरजेतून टेलिफोनचा शोध. त्यानंतर मोबाईलचा शोध. रेडीओ, टी. व्ही., संगणक, इंटरनेट ही सर्व सर्जनशील विचार करून केलेल्या कृतीची
(Critical Thinking)
माहितीचे किंवा अनुभवाचे स्वतःच्या क्षमतेनुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात सूक्ष्मपणे विश्लेषण आणि परीक्षण करण्याची क्षमता म्हणजे चिकित्सक विचार. एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहान-लहान प्रश्नांच्या साहाय्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजे चिकित्सक विचार. यामुळे ‘तर्कशुद्ध विचार’ या क्षमतेची निर्मिती होते.
उच्च दर्जाची विचार प्रक्रिया-विचारांचे पृथक्करण- चिकित्सक विचार- कारणमीमांसा- पूर्वानुभावाची जोड- तर्कसंगतता- पर्यायांचा शोध
नवनवीन कल्पनांची निर्मिती करण्यासाठी मुलांना पालक व शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.
(Coping With Emotions)
स्वतःच्या व इतरांच्याही भावना जाणून घेणे, त्या भावनांचा स्वतःच्या वर्तनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार भावनांचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन करणे म्हणजे भावनांचे समायोजन.
भावना म्हणजे कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मनाची प्रक्षुब्ध अवस्था. भावना सकारात्मक असोत किंवा नकारात्मक, जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले, तर त्या अपायकारक ठरतात. म्हणून भावनांचे समायोजन करायला शिकले पाहिजे.
प्रक्रिया-
भावना- अभिव्यक्ती- तीव्रता- घडणार्या कृती- होणारा परिणाम- कारणमीमांसा, परिणामांचा विचार- घडणार्या कृती थांबवणे- नियंत्रण करणे.
आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात की ज्यामुळे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मग अविचाराने कृती घडते व नंतर पश्चात्तापाची वेळ येते. म्हणून आधीच परिणामांचा विचार लक्षात घेऊन भावनांवर ताबा किंवा व्यवस्थापन कर्ता यावे.
(Coping With Stress)
दैनंदिन जीवनात येणार्या ताण-तणावांचा/ दडपणाचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
एखादे कार्य करताना अनेक समस्या येतात व दडपण येते. त्यामुळे तणाव येतो. अशावेळी दीर्घकाळ तणाव राहिला तर त्याचे पर्यवसान मनोशारीरिक समस्या/आजार उद्भवतात. म्हणून ताण-तणावांची योग्य हाताळणी करणे आवश्यक असते.
प्रक्रिया-
यातील जवळपास सर्वच जीवनकौशल्ये ही निरनिराळ्या खेळांमधून, कलांमधून, चांगल्या पद्धतीने करणे नकळत व सहज शक्य होते.
बालकाची सुरुवातीची वर्षे ही फार मोलाची असतात. या काळातल्या शिक्षणाचा ठसा आयुष्यभर कायम राहतो. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत बहुतांश ठिकाणी आई-वडील दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर पडत असल्याने व विभक्त कुटुंब असल्याने लहान मुलांना पालकांचा सहवास फार कमी मिळतो. मुले पाळणाघरात वाढतात. त्यामुळे शाळांची पर्यायने शिक्षकांची जबाबदारी जरा जास्त वाढली आहे. त्यासाठी जगभरात शिक्षणक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि महाराष्ट्र ही तर शिक्षणाची प्रयोगशाळाच आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक चांगली मूल्ये रुजावीत म्हणून मूल्यशिक्षणाचा प्रयोग देखील अभ्यासक्रमातून प्रथमतः महाराष्ट्रातच केला गेला. आणि याच्या पुढचे पाऊल म्हणजेच जीवनकौशल्यांचे शिक्षण होय.
शाळांनी फक्त शैक्षणिक केंद्रे असून चालणार नाही, तर त्यांनी ज्ञान व कौशल्ये यांची केंद्रे बनले पाहिजे. असे सार्थ उद्गार भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे आहेत. जीवन जगताना फक्त ज्ञान आणि पदवी मिळवून चालणार नाही तर ज्याच्याजवळ कौशल्य आहे तोच जीवनसंग्रामात टिकेल, पुढे जाईल. म्हणून शालेय जीवनापासूनच जीवनकौशल्ये शिकवणे गरजेचे बनले.
जीवनकौशल्यांमधून मुलांमध्ये समजूतदारपणा, शांतता, सहनशीलता, इतरांशी मैत्रीपूर्ण सहसंबंध, जबाबदारीपूर्वक जीवन जगणे याबरोबरच मुलांना विध्वंसक व विघातक वर्तनापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
या कौशल्यांचे शिक्षण हा एक विकासात्मक दृष्टिकोन आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, गरजा, आव्हाने यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण करून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून भावी जबाबदार नागरिक निर्माण करण्याचे काम जीवनकौशल्यांच्या शिक्षणातून होणार आहे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रयत्नशील राहावे.
संदर्भ-
- डॉ. संध्या जिंतूरकर