जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें
तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा!
नमस्कार, आज मी एका महान संताबद्दल बोलणार आहे. ज्याने संपूर्ण जगाला कसं जगायचं हे शिकवलं. ‘संत तुकाराम महाराज.'
तुकाराम महाराजांचा जन्म 1520 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू नावाच्या गावात झाला. ते देहू गावातील सावकार असल्याने त्यांचे कुटुंब तेथे प्रतिष्ठित मानले गेले.
तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या भक्ती मोहिमेचे सतराव्या शतकातील कवी-संत होते. ते सामनाधिकारी, वैयक्तिक वारकरी, धार्मिक समुदायाचे सदस्य होते. तुकाराम त्यांच्या अभंग आणि भक्तीपर कवितांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी त्यांच्या समाजातील देवाच्या भक्तीबद्दल अनेक आध्यात्मिक गाणीदेखील गायली आहेत, ज्यांना स्थानिक भाषेत कीर्तन म्हणतात. त्यांच्या कविता विठ्ठल आणि विठोबाला समर्पित होत्या.
आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली. कधीही भंग न पावणाऱ्या हजारो अभंगांची रचना करून जनसामान्य मराठी भाविकाला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहज आणि सोपा उपदेश केला आहे.
संत तुकारामांनी 500 हून अधिक अभंग केले आहेत.
आजही त्यांचे अभंग महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गायले जातात. काही परदेशी लोक पंढरपुरात येऊन अभंग गातात. त्यामुळे तुकाराम महाराजांचा जगावर किती मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
तुकाराम महाराजांचे जीवन लहानपणापासूनच संघर्षमय गेले. ते खालच्या जातीतले असल्याने लोकांनी त्याला त्रास दिला, पण तरीही तिथे त्यांनी विठ्ठलाची भक्ती थांबवली नाही. म्हणजे बघा किती निस्वार्थीपणे त्यांनी भगवान विठ्ठलची भक्ती केली, तसेच आपन ही निस्वार्थपणे विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे. तर बोला पंढरीनाथ महाराज की जय!
- Amogh V. Deshpande
Vision English Medium School